मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग दोन वर्षात पुर्ण होणार
Dhule,Nandurbar
मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी सातत्याने पाठपुरावा केला. हा मार्ग लवकरच पुर्ण होणार असून दळणवळण मंत्री ना.नितीन गडकरी यांनी येत्या दोन वर्षात मार्ग सुरू करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. रस्ते विभागाची प्रती वर्षी ५७० कोटी रूपयांची बचत होणार आहे. अशी माहिती आ.अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुढे बोलतांना आ.गोटे म्हणाले की, मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग करावयाचा असल्यास महाराष्ट्र व मध्यप्रदेश सरकारच्या ५० टक्के सहभागाचा तसेच शासकीय जमीन विनामोबदला संपादन करून द्यावी अशा प्रकारच्या अडचणींच्या अटीची पुर्तता कशाप्रकारे करावी? हा प्रश्न निर्माण झाल्याने रेल्वेमार्ग मंजुर होवून रखडला आहे. रेल्वे मार्गाच्या प्रश्नांची माहिती...
more... नसणार्यांनी पुर्नसर्व्हेक्षण करण्याचे घाट घातला. यापुर्वी तीन वेळा सर्व्हेक्षण होवून तसेच नियोजन आयोगाने दि.२० जुन २०१२ रोजी प्रस्ताव मान्य करून दिल्यानंतर चौथ्यादा सर्व्हेक्षणाचा घाट का घातला जात आहे? असे त्यांनी सांगितले. पुढे बोलतांना आ.गोटे म्हणाले की, रस्ते व जल वाहतूक तसेच दळणवळण मंत्री ना.नितीन गडकरी यांनी रेल्वे मार्गाचा प्रश्न गांभीर्याने घेतला आहे. जेेएनपीटी बंधार्यातून प्रतीवर्षी ४५ हजार कंटेनरर्स इंदूर जवळील प्रितमपूर औद्योगिक वसाहतीत पाठविल्या जातात. सर्व कंटेनरर्स रतलामपर्यंत रेल्वेमार्गाने जातात तेथून १५० किलोमीटर भुमार्गानेच प्रितमपूर एमआयडीसी पर्यंत पोहोचवावे लागतात. यामुळे फार मोठा कालावधी लागतो व भाडेही जास्त भरावे लागते. यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र.३ वर फार मोठ्या प्रमाणात बोजा पडतो. एवढेच नव्हे तर ओव्हरलोड कंटेनरर्समुळे मोठ्या प्रमाणात गंभीर अपघात होता. त्यामुळे वाहतूकीवर परिणाम होतो. वाहनांची वाहतूक थांबल्याने नागरिकांची वेळ व पैसा अकारण भुर्दंड सोसावा लागतो. ४५ हजार कंटेनर वाहतूकीतून रेल्वेस ५७० कोटी रूपयांचे उत्पन्न मिळत असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. हा उत्पन्नाचा एक नवापैलू मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गामुळे लक्षात आला आहे. असे आ.गोटे यांनी सांगितले. जहाज, रस्ते वाहतूक विभागाचे भुपृष्ठ वाहतूक व रेल्वेच्या अति वरिष्ठ अधिकार्यांच्या तीन बैठका झाल्या. या तीन बैठकांमध्ये रेल्वेच्या अधिकार्यांनी कंटेनर वाहतूकीची माहितीबाबत प्रश्न मांडला आहे. जेएनपीटीच्या अधिकार्यांनी तयार केलेल्या अहवालात केवळ कंटेनरच्या वाहतूकीमधून रेल्वेस प्रतीवर्षी ५७० कोटी रूपये मिळाल्याची वस्तुस्थिती मांडली आहे. ५७० कोटी रूपये केवळ ४५ हजार कंटेनरच्या वाहतूकीने मिळतात. परंतु रस्त्याच्या वाहतूकीने २५ हजार एकत्र केल्यास हे उत्पन्न ७०० कोटी रूपयांच्यावर जावू शकते. तसेच २५ हजार कंटेनर रस्त्याने जात असल्यामुळे महामार्गाने होणारे नुकसान, प्रदुषण व लागणारा पंधरा दिवसाचा वेळ कमी होवून केवळ दहा तासात कंटेनरची वाहतूक होवून दहा तासात होणार्या वाहतूकीमुळे औद्योगिक विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल व त्याचा सर्वात जास्त लाभ केवळ धुळे जिल्ह्यालाच मिळेल असे नाही. तर महाराष्ट्रातून हा रेल्वे मार्ग १९२ किमी जात असल्यामुळे महाराष्ट्रालाच जास्त फायदा मिळेल. यामुळे ना.नितीन गडकरी यांनी हा रेल्वेमार्ग रस्ते वाहतूक, जलवाहतूक व दळणवळण मंत्रालयातर्फे करण्याचा निर्णय घेतला असून येत्या दोन वर्षात मार्ग सुरू करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. असे आ.गोटे यांनी सांगितले.
click here