Search Forum
Blog Entry# 4234773
Posted: Feb 17 2019 (18:46)
No Responses Yet
No Responses Yet
पंतप्रधान मोदी म्हणाले, की धुळ्याच्या विकासासाठी अब्जावधीच्या निधीतून साकारणाऱ्या योजनांचे लोकार्पण, पायाभरणी, उद्घाटन झाले. पाणी, सिंचन, दळणवळणाच्या रेल्वे, महामार्गासारख्या सोयीसुविधांमुळे धुळ्याचा सुरतसह देशातील "कनेक्ट' वाढणार आहे. तो औद्योगिक विकास, व्यापारवृद्धी आणि रोजगारनिर्मितीसाठी पूरक ठरणार आहे. जिल्ह्याची या क्षेत्रात विकास साधण्याची पुरेपूर क्षमता आहे. ती आणखी मंजूर विकास प्रकल्प, योजनांमुळे आणखी सशक्त होणार आहे. मनमाड- इंदूर रेल्वे मार्गाअंतर्गत धुळे- नरडाणा रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी आज झाली. भविष्यात हा मार्ग मनमाड- इंदूरला जोडला जाईल. त्यासाठी नऊ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. धुळे विकासाचा हा राजमार्ग पूर्ण झाल्यावर इंदूर ते मुंबईपर्यंत आणि देशातील कानाकोपऱ्यापर्यंत या जिल्ह्याला पोहोचता येईल. उधना- जळगाव, उधना- नंदुरबार, उधना- पाळधी रेल्वे, भुसावळ ते बांद्रा (खानदेश एक्स्प्रेस) या रेल्वे सुविधा आज राष्ट्राला अर्पण झाल्या. त्यामुळे देशाशी "कनेक्टिव्हिटी' वाढून विकासाला चालना मिळेल.