Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt

RailCal app

site support

Regular people go to see Taj Mahal. RailFans go to see Ghaziabad Jn. - Praveen

Search Forum
<<prev entry    next entry>>
Blog Entry# 5517927
Posted: Oct 19 2022 (08:16)

No Responses Yet
General Travel
7118 views
0

Oct 19 2022 (08:16)   07812/Tirodi - Tumsar Road DEMU Special | TMR/Tumsar Road Junction (5 PFs)
RailfanfromTMR
RailfanfromTMR   130 blog posts
Entry# 5517927            Tags   Past Edits
लोकल ट्रेन बंद असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी

खासदारांची रेल्वे मंत्र्यांजवळ चालते की नाही? रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांचा सवाल

मोहाडी : भंडारा व गोंदिया जिल्ह्याची प्रवासाच्या बाबतीत लाईफलाईन समजली जाणारी डोंगरगढ ते इतवारी लोकल, तिरोडी
...
more...
ते इतवारी लोकल आणि गोंदिया - कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस प्रवासाचे स्वस्त साधन आहे, किंबहुना होते. गरीब मजुरांना त्यांच्या उपजीविकेसाठी नागपूरला जाणे या गाड्यांमुळे सुखकर व्हायचे. मात्र कोरोनाच्या काळात डोंगरगड ते इतवारी लोकल पडल्यापासून अद्यापही रुळावर आली नाही. महाराष्ट्र एक्सप्रेसबद्दल बोलायचे झाले तर दौंडजवळ दुहेरी रेल्वे मार्गाच्या कामासाठी महाराष्ट्र एक्सप्रेस ६ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर या कालावधीत बंद ठेवण्यात आली आहे. यामुळेही प्रवाशांची परवड होत आहे. अनेकदा रेल्वे विभागाकडे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींकडे या मार्गिकेवरील सर्व लोकल गाड्या पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे; परंतु खासदारांना स्थानिक प्रवाशांच्या अडचणी दिसत नाही का? जर दिसतात तर, रेल्वे मंत्र्यांजवळ खासदार या सर्व अडचणी मांडल्या की नाही? आणि जर खासदारांनी रेल्वे मंत्र्यांकडे या सर्व अडचणी मांडल्या; परंतु खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे चालते की नाही? जर खासदारांना जमत नसेल तर त्यांनी तसे सांगावे, आम्ही रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे आपले गराने सांगू, असे व्यंगात्मक प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत?

डोंगरगढ ते इतवारी लोकल, तिरोडी ते इतवारी लोकल कोरोना नंतर रुळावर आलीच नाही. यामुळे परिसरातील सामान्य नागरिक चिंतेत आहेत.-तिरोडी ते कटंगी हा नवीन रेल्वे मार्ग तयार आहे. मात्र, त्याचा वापर होत नाही. कदाचित रेल्वे प्रशासनाला जनतेच्या समस्या ऐकून घेणे आवडत नाही. केंद्रात मजबूत सरकार बनवण्याचे फळ जनतेला मिळत आहे, अशी भावना सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. तुमसर स्थानकातून सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास सुटणारी लोकल अनेकांच्या आयुष्यात आनंद घेऊन येत होती. परिसरातील आपले जीवन जगणारे करणारे अनेक नागरिक या ट्रेनचा सहारा घेत होते. दूध वाले, शेतीचे काम करणारे शेतमजू, दही विकणारे भाजी विकणारे, गवंडी काम करणारे अनेक मजूर या ट्रेनच्या माध्यमातून थेट इतवारी पर्यंत काम करण्यासाठी जायचे; परंतु सध्या ही ट्रेन बंद असल्याने अनेक मजूर बेरोजगारीच्या संकटात सापडले आहेत. जिल्ह्यात वेळोवेळी पडणारा अवकाळी पाऊस यामुळे शेतीवर विसंबून राहणे सध्या कोणालाही परवडत नाही; त्यामुळे जिल्हा बाहेर जाऊन काम करण्याची प्रत्येकाची इच्छा आहे. परंतु सध्या रेल्वेच्या अनियमित्येमुळे मजूर अव्वाच्या सव्वा रोजीत गावातच काम करण्यासाठी मजबूर आहेत.

अन्यथा प्रवासी आंदोलनाच्या तयारीत

रेल्वे प्रवाशांचे सोडा, खासदार-आमदारांचेही रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे प्रशासन ऐकत नाही. यापेक्षा लोकशाही असलेल्या देशातील दुःखाची बाब आहे. कदाचित याच कारणामुळे माजी खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिला असावा. बावनथडी नदीच्या पलीकडे असलेल्या मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्याच्या भागाला पठारी प्रदेश म्हणतात. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागाच्या रेल्वे व्यवस्थापकांनी पठार भागातील लोकांना १५ दिवसांत पॅसेंजर ट्रेन सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. रेल्वे प्रशासनाच्या या आश्वासनानंतर पठार भागातील नागरिकांनी आंदोलन मागे घेतले. आता पुन्हा आंदोलनाची तयारी सुरू करण्यात आली आहे. या आंदोलनात तुमसर तालुक्यातील नागरिकांसह तिरोडी मँगनीज खाणीत काम करणाऱ्या कामगारांनाही सहभागी असणार आहे. खाण कामगारांची संघटनाही आता प्रवासी गाड्यांसाठी रणांगणात उतरण्याची शक्यता आहे. देशातील सर्वात मोठा सण दीपावली जवळ येत आहे. रेल्वे प्रशासनाने सर्वसामान्यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये, असे रेल्वे सामान्य नागरिकांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्र एक्सप्रेस सुद्धा बंद

६ ऑक्टोबर पासून महाराष्ट्र एक्सप्रेस ही बंद करण्यात आली आहे. अनेक प्रवाशांना त्यांची आगाऊ आरक्षण रद्द करावी लागली. वास्तविक पाहता महाराष्ट्र एक्सप्रेस मनमाड-कल्याण मार्गे पुणे आणि पुढे कोल्हापूर पर्यंत धावू शकते; परंतु मध्य रेल्वे याबाबत सकारात्मक दिसत नाही.

ग्रामीण भागातील नागरिकांना व्हायचा फायदा

गोंदिया जिल्ह्यातील लहान-मोठ्या खेड्यात थेट नागपूरला जोडणाऱ्या अनेक लोकल गाड्या सद्या बंद आहेत. या गाड्यांचा फायदा गोंदिया, गंगाझरी, काचेवानी, तिरोडा, मुंडीकोट, तुमसर रोड, कोका भंडारा रोड, खात, रेवराल, तारसा, चाचेर, सालवा, कन्हान, कामठी, कळमना, व इतवारी या रेल्वे स्थानकांच्या परिसरातील नागरिकांना व्हायचा. गोंदिया ते इतवारी प्रवास करण्यासाठी फक्त तीस रुपये एवढे प्रवासभाडे लागायचे. सध्या यासर्व लहान रेल्वे स्थानकांना जोडणारी ०८७४३ ही गोंदिया-इतवारी स्पेशल मेमु ट्रेन धावत आहे. या मार्गिकेवरील सर्व लोकल गाड्या पूर्ववत सुरू कराव्या अशी मागणी प्रवासी करत आहेत.

Translate to English
Translate to Hindi
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Desktop site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy